Search This Blog

Wednesday, July 15, 2020

गावच नव्हतं पत्यावर



एका उपाशी डोंगरानं खाल्लं माझं गाव
जगाच्या नकाशावर पुसलं त्याचं नाव
सुनी सुनी वाटे रिकामी आता जागा
डोंगराने पाडल्या जणू हृद्यात भेगा

मानवाने दिल्या होत्या कटूत्वाच्या जखमा
त्याच्याच मोजल्या आज त्यांनी रकमा
तांडवाची डोंगराला आली होती लहर
सोसू नाही शकलं गाव त्याचा कहर

सकाळी पडला होता आंगणात सडा
मन हलवुन गेला पाहुन तो रडा
सारं गाव दडलं डोंगराच्या गाळात
कोणी नाही सुरक्षित कुठल्याच माळात

गाई गुरे निजली होती गवताच्या उशीत
डोंगरानं घेतलं त्यांना आपल्याचं कुशीत
सकाळची एसटी आली होती रस्त्यावर
पण गावच नव्हतं आज त्याच्या पत्त्यावर

रानमोती काव्यसंग्रहातून.....


 ©Rani Amol More

11 comments:

  1. मनावर आघात करणारा तो प्रसंग आज डोळ्यात पाणी आणुन गेला. खूप छान मांडनी.

    ReplyDelete
  2. माळीन दुर्घटनेत प्राण गमावलेल्यांना विनम्र अभिवादन..

    ReplyDelete
  3. अप्रतिम 👌👌👌

    ReplyDelete
  4. खूप छान मांडणी👌👌

    ReplyDelete
  5. खूपच भावस्पर्शी रचना.
    वाचून संपूर्ण चित्र डोळ्यासमोर उभे राहिले.

    ReplyDelete
  6. खूपच छान तो प्रसंग जसाच्या तसा उभा केला डोळ्यासमोर!अप्रतिम

    ReplyDelete
  7. अप्रतिम कविता , उल्लेखनीय ‘ ��

    ReplyDelete
  8. खूप छान दीदी ������

    ReplyDelete
  9. मन हलवुन गेला पाहुन तो रडा
    .. भावना प्रधान लिखान.👌

    ReplyDelete
  10. अप्रतिम मांडणी, भावना प्रधान काव्य 👍

    ReplyDelete

Your valuable comments are highly appreciated and very much useful to further improve contents in this Blog.

Recent Posts

Mumbai’s teen innovator and author Arjit More wins International Excellence Award 2026

Teen author and innovator Arjit More from Washim has been honoured with the International Excellence Award 2026 for his research-driven writ...

Most Popular Posts