Search This Blog

Saturday, June 27, 2020

वारी - परंपरा तीच रस्ता नवा


वारी ही अनेक शतकांपासून चालत आलेली धार्मिक, सांस्कृतिक आणि काही प्रमाणात भावनिक परंपरा आहे, जी बदलत्या काळानुसार देखील आपल्या महाराष्ट्रातील प्रत्येकाच्या मनात तशीच जपलेली आहे. विठ्ठल हे महाराष्ट्राचं आद्य दैवत. परंतु तसा तो गोर गरिबांचा दिन दुबळ्यांचा देव म्हणून ओळखला जातो. वारी या शब्दाकडे बघण्याचे दोन ठळक दृष्टिकोन आपल्याला सहज लोकमानसात बघायला मिळतील. एक म्हणजे तो वर्ग आहे जो आधुनिकतेच्या आणि प्रबोधनाच्या वाटचालीकडे वळू पाहतो व त्याच्या नजरेतून वारी ही कदाचित भोळी श्रद्धा आणि प्रदूषणाची एक लहर असू शकते. तर दुसऱ्या बाजूने एक वर्ग आहे जो आधुनिकतेला हळूहळू आत्मसात करणारा परंतु वारी ही त्याचा ‘जीव की प्राण’. ज्यामध्ये आपली संस्कृती, आपली माणसं आणि प्रत्यक्षात कधीही न दिसणाऱ्या पण एका वेगळ्याच काल्पनिक उच्च कोटीच्या भावनिक श्रद्धेने वारीच्या गर्दीत विठ्ठलाला शोधणाऱ्या ग्रामीण भागातील वर्गाचा समावेश होतो. काही तुरळक जनता अशीही असेल ज्यांना वारी तर हवी परंतु प्रदूषण किंवा आंधळा विश्वास नको अशी म्हणणारी. या सर्व घटकांचा एक सुवर्णमध्य काढण्याचा विचार आपण या लेखात पाहुयात.

चला तर मग वारीचे थोडे विश्लेषण करूया;
साधारणतः वारीला जाणारा जो वारकरी संप्रदाय आहे तो ग्रामीण भागातील आहे, असं पूर्णपणे म्हणता येणार नाही. कारण मुंबई, पुणे व पर राज्यांसहित परदेशातील भाविक मंडळीही वारीत सहभागी होत असल्याचे आपल्याला ठाऊक आहे. खूप नाही परंतु शहरी भागातील भाविकांचा सहभाग ग्रामीण भागातील भाविकांपेक्षा थोडा कमीच असतो. हे विश्लेषण या करीता, कारण वारीचा जो नवा रस्ता आपण बांधणार आहोत, त्यात यांचा सहभाग फार मोठा असणार आहे. वर्षानुवर्षे वारीत सहभागी होणाऱ्या भाविकांची संख्या वाढतांना आपण वृत्त वाहिन्यांवर ऐकत आणि बघत सुद्धा असतो. प्रत्येक वेळेला आपल्याला जाणवते एखाद्या चांगल्या व परिवर्तनवादी सुरवातीसाठी जनमाणसं एकत्र जमविणे फार कठीण आहे. आपलं हे कठीण काम विठ्ठल त्याच्या वारीच्या रूपातून कित्येक वर्षांपासून पूर्ण करीत आहे, फक्त गरज आहे ते आपण जाणण्याची. दरवर्षी पंढरपूरला जाण्यासाठी भाविक महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यातून शेकडो रस्त्यांवरून पैदल प्रवास करून येत असतात आणि या प्रवासा दरम्यान हे भाविक ठिकठिकाणी मुक्काम देखील करतात. त्यांच्या ह्याच पद्धतीचा वापर आपण प्रबोधन आणि ज्ञान संवर्धनासाठी करायला पाहिजे. म्हणजे ग्रामीण भागातील शेतकरी, कष्टकरी वर्ग, शहरी भागातील सामान्य मजूर वर्ग आणि देश विदेशातील आपल्याकडील सर्व सुख सोयीचा त्याग करून मन:शांतीसाठी आलेला परदेशी वर्ग एकंदरीत वारकरी हा आपला जमाव असणार आहे.
 
पंढरपूरला जाणारे सारे रस्ते ज्या ज्या मार्गाने वारकरी पंढरी गाठतो ते सर्व आपल्या ज्ञान संवर्धनाचे प्रभोधनाचे व आधुनिक जगाचा स्वीकार करण्याचे मार्ग ठरू शकतील. जसे की अनेक शेतकरी आत्महत्येला बळी पडतात, अश्या शेतकरी वर्गाला वारीच्या माध्यमातून जागोजागी कृषी प्रदर्शन्या भरवून शेतकऱ्यांसाठी शासनाने कोण-कोणत्या योजना आखल्या, त्यांचा फायदा कसा घ्यायचा याची इत्यंभूत माहिती तथा आधुनिक तंत्रज्ञानाला अवगत करून मार्गदर्शन करून देण्याची सोय उपलब्ध करून देता येईल. त्याच बरोबर वारकऱ्यांचा जिथे जिथे मुक्काम किंवा थांबा असतो अश्या ठिकाणी ग्रामीण भागातील लघु उद्योगांना, बचत गटांना, शेतकऱ्यांच्या समूहाला प्रोत्साहन मिळावे म्हणून आपले स्टॉल उभारणीसाठी शासनाच्या किंवा खाजगी सहभागातून मदत करता येईल. देवाच्या दानपेटीत मोकळ्या हातांनी दान करणाऱ्या श्रीमंत वर्गाचा सहभाग देखील या वारीचा रस्ता दुरुस्ती तथा सुशोभीकरणासाठी आणि ग्रामीण भागातील समस्यांचे निराकरण करण्यासाठी घेता येईल. ज्यामधून एक सामाजिक सलोखा तयार होऊन गरीबी व श्रीमंतीची दरी थोडी कमी होण्यास मदत होईल. हे सर्व करीत असतांना शहरी भागातील सामाजिक संस्थांचा सहभाग अत्यंत महत्वाचा राहणार असल्याने गाव किंवा तालुका पातळीवर त्यांचे दायित्व निर्धारित करून खऱ्या अर्थाने ग्रामीण भागातील विकासात्मक कार्यात त्यांचा सहभाग वाढवता येईल.
 
विठ्ठलाच्या दारी पोहचेपर्यंत वरिल बाबींचा अवलंब केल्यास प्रत्येक वारकरी हा ज्ञानाने आणि माहितीने समृद्ध झालेला असेल. ज्याप्रमाणे प्रत्येक क्षेत्राची समृद्धी, दबदबा हा तेथील लोकांच्या वागणुकीवरून ठरत असतो व त्या करिता त्या क्षेत्रातील प्रत्यक माणूस हा प्रशिक्षणाने व शिस्तीने तयार केला जातो. त्याचप्रमाणे जर आपण विठ्ठलाला आपलं महाराष्ट्राचं आद्य दैवत आणि वारीला आपली संस्कृती मानत असू तर तेथे जाणारा प्रत्येक वारकरी ज्ञानाने संप्पन, कर्तबगारीने समृद्ध आणि सामाजिक जाणिवांनी व स्वछतेच्या सवयीने प्रशिक्षित केलाच पाहिजे. म्हणूनच विठ्ठलाचं घर व तिथपर्यंत पोहचण्याचा मार्ग आपण ज्ञान संवर्धनाचे, सामाजिक बांधिलकीचे, विकासाचे व स्वच्छतेचे प्रतीक बनविले पाहिजे जेणेकरून ‘एक समृद्ध देवस्थान एक समृद्ध महाराष्ट्र’ अधोरेखित करेल. जेव्हा विठ्ठलाचे हे लाडके वारकरी त्याच्या गळाभेटीला समोर उभे ठाकतील तेव्हा त्यांच्या मुखावर प्रसन्नता आणि समाधान असेल आणि ते बघून विठ्ठलही अंतर्भावातून संपूर्ण महाराष्ट्राला आणि वारीच्या संस्कृतीला खऱ्या अर्थाने आशीर्वाद देईल. 

- राणी अमोल मोरे


(आजचा लेख भविष्यातील लघुकथा)

Friday, June 26, 2020

अनछुई



बिखरी थी चीजें कोने में
यूँही नजर पडी अनजाने में
टुट टुट के चूर हुयी थी
न जाने कितनी मजबूर हुयी थी

कबसे सारी अनछुई थी
अंदर ही अंदर कही गुम थी
कतरा कतरा घर का सजा था
बस वही कोना अनजाना सा था

पहेली ये सदियों पुरानी थी
बस बाते अब रुमानी थी
कोई सुलझाएगा यही आस थी
किसी के छूने की तलाश थी

जब सँवारने निकले कुछ हाथ
उन्हें भी बना दिया अनाथ
हालात से जुझते हैं जोशवाले
कोई नहीं समझता उन्हें होशवाले

- राणी अमोल मोरे

Thursday, June 25, 2020

डीपी


डीपी

डीपी तुझा किती सुंदर 
कुणाची नजर लागेल 
आज तू एक वेळेला 
जेवली नाही तरी भागेल

गॉगल लावून किती 
छान देतेस तू पोज 
जरी चेहऱ्यावर असले
चपटे चपटे नोज

दिवसभरात दहा वेळा 
डीपी तू बदलते
दुसऱ्याची पाहून लगेच
तुझी का गं सलते

नवीन नवीन कपड्याची 
खरेदी तू करतेस 
वेगळी फॅशन दिसताच 
मनाशीच झुरतेस 

चालू दे जोरात 
तुझा वरवरचा थाट 
फॅशन च्या नादात
लागू दे सेविंगची वाट


- राणी अमोल मोरे

Wednesday, June 24, 2020

बचपन के मिट्टी के..



बचपन की मिट्टी के वो पुराने किस्से
फटी जेब से नानाजी के गिरते थे सिक्के
चोरीसे छुपकर हम उठा लेते थे एक एक
जानकर भी वो कहते मेरे पोता पोती बड़े नेक
वो पल सुनहरे और दिन थे अच्छे
हम बड़े चतुर पर नादान थे बच्चे
सिक्को को मुट्ठी में हलकासा दबाकर
हाथों को थोड़ा इधर उधर घुमाकर
ले जाते थे उन्हें सबसे बचाकर
दौड के सब पहुंचते थे दुकान में
खट्टी मीठी गोली खाते थे जुकाम में
घर लौटने पर माँ निहारती थी गौर से
फिर वो डाटकर चीखटी थी बड़े जोर से
हम नाटक करते थे फुटफुट के रोने का
तब एहसास होता था नानीजी के होने का
वो प्यार से समझाकर हम सब को बुलाती
थोड़ा पेड़ से लटके झूले पर झूला झुलाती
और माँ के बचपन के किस्से सुनाती
हम भी फिर हस देते थे खिलखिलाकर
ऐसे ही दिन गुजर जाते थे झिलमिलाकर
बचपन के मिट्टी के वो पुराने किस्से..

- राणी अमोल मोरे 

Tuesday, June 23, 2020

तूच ठरव..



एका श्वासाचा तू मालक
दुसऱ्यावर नाही तुझी मालकी
कुठल्या भ्रमात आहेस वेड्या
क्षणभर जीवन विकत घेण्याची
तूच ठरव आहे का तुझी लायकी ?

दुर्गुणांनी वेढलास किती
डोक्यावर अहंकाराचा केवढा भारा
जीवनाच्या व्याख्या असतील कितीक
खरे जीवन आहे तरी काय
नुसता आत बाहेर सोडलेला वारा

चेहऱ्यावर स्मित फुलण्यासाठी
दुसऱ्यांची गरज तुला भासते
डोळ्यातले अश्रू गाळण्यासाठी
इतरांची भिती का वाटते
तूच ठरव कसा तू स्वावलंबी

तेला विना वात जळणार नाही
संवेदनेशिवाय सुख-दु:ख कळणार नाही
तूच ठरव कसे जगायचे
जीवन आनंद अमृत प्राशायाचे
की शिक्षा मिळाल्यागत भोगायचे

अध्यात्म ही किती वाचून झाले
अनेक महात्मे सांगून गेले
जोवर अंतराला जाणणार नाही
तोवर जीवन आनंद गवसणार नाही
तूच ठरव कसे शोधायचे

- राणी अमोल मोरे

Monday, June 22, 2020

कितना बोया..




ऐ मेरे देश के भूमिपुत्र
तेरे कर्म देते है जीवन के सूत्र

सदियों से हल चलाके तूने
भूकों का हल है निकाला
मेहनत करने की तूने
न जाने कौनसी सीखी पाठशाला

मुट्ठीभर बीज बो कर तूने
हरतरफ हरयाली है लायी
दिन रात की मेहनत से तेरे
देश में समृद्धी है आयी

तू क्यूँ सोचे फांसी का फंदा
रब का तू बड़ा ही नेक बंदा
कितना बोया कितना कटाया
बदले में तूने कुछ नही पाया

तू कर ख़ुदको ही सलाम
नही तू किसी समस्या का गुलाम
खड़े रहना हमेशा तान सिना
बहाया तूने अपना खून पसीना

- राणी अमोल मोरे 

Sunday, June 21, 2020

भक्ता ! काय ते भले


 
भक्ता ! काय ते भले

'देवा तू उभाच’ अजून कसा रे दमला नाही
विटेवरच्या विठ्ठलाला भक्त कधी बोलला नाही
पंढरपुरी वारी करण्या मात्र कधी डगमगला नाही
वरवरचा जप सोडता 'सत्य' कधी समजलाच नाही

चंद्रभागेत डुबक्या मारून पाणी करतो घाण
विठ्ठलाची पंढरी भक्ता सांग कशी दिसेल छान
मागच्या वर्षी पाच लाख यावर्षी दहा लाख
सोडून जातात फक्त प्रदूषणाची सडकी राख

गर्वाने सांगतो आपण यात्रेला परदेशीही आले
त्यांचही मनं दुखते जेव्हा दिसतात सुंदर नदीचे नाले
लाईव्ह दाखवतात चॅनलवाले सारी ती गर्दी
घरी परतल्यावर अर्ध्यांना झाली असते सर्दी

घंटा वाजवून, टाळ बडवून तो जागा होत नाही 
माय बाप सुखी नसतील तर देव कधी पावत नाही
विठ्ठलाचं देवपण आम्हाला कधी कळलंच नाही
पंढरीच्या यात्रेला सांगा अर्थ कसा उरेल काही

खुळ्या भक्तांना पाहून विठ्ठल होत असेल दंग
विटेवरून खाली न उतरण्याचा त्यानेही बांधला चंग
परंपरा सांगते पंढरीच्या यात्रेला एकदा तरी जावं
अंतर्मनाच्या शुद्धतेसाठी सर करावं पंढरपूर गावं

अज्ञानाच्या गर्दीत भक्ता सांग तू कुठे हरवलास
संतांच्या विचारांचा खडू तू का नाही गिरवलास
लोक कल्याणासाठी त्यांनी जीवन अर्पण केले
तरी तुला कळलेच नाही तुझ्यासाठी 'काय ते भले'

- रानमोती



Friday, June 19, 2020

..इस वतन से



कसूर क्या था उनका
घर वापस आ ना सके
बहुत समझ ली दुनियादारी
उनका समर्पण समझ ना सके

ज़मीन की लालच में
दुश्मन हरपल डाले डेरा
सुरक्षित रहेगा देश हमारा
जब तक है जवानों का घेरा

विश्व में वर्चस्व के
लग रहे है नारे
आज लड़ रहे है चिनी
तो कल लड़ते थे गोरे

पूँछ लो एक दफ़ा
खुदही अपने दिल से
क्या सच में हमें
प्यार है इस वतन से

तो भूल जाओ सब
आपस का लढ़ना
शुरू करो मिलके
एक साथ जुड़ना

साथ रहेंगे हम उनके
जो सोचे इस देश का
मिटा देंगे हम उनको
जो साथ दे गद्दारों का

दिखा देंगे दुनियाँ को
ज़ोर करोडो भारतीयों का
ताकि उठ ना सके सिर
फिर कभी दुश्मनों का

- राणी अमोल मोरे

सून काय सासू काय - दोघी सेम सेम


सून काय सासू काय  - दोघी सेम सेम

नखरेल सुनेला बघून,
खट्याळ सासू झाली गरम

सासूने केली तोफ, दणक्यात सुरु
कोपऱ्यात मात्र, सून रडे भुरुभुरु

कशी मारली फोडणी, ठसका उडाला 
मोबाईलच्या नादात पोरी, रस्सा जळाला

गोल गोल पोळ्यांचा, झाला बघ त्रिकोण 
स्टेटसच्या नादात तुझं, घरात असते मौन
 
बेसिनमध्ये भांड्याचा, रचला केवढा कळस
तरी डिपीमध्ये सर्वांच्या, तुझाच बाई सरस
 
कपाटात गठ्ठा, तुझ्या हजार साड्यांचा 
लेकाने भरला हप्ता, आजच भाड्याचा
 
मोकळ्या तुझ्या केसांची, स्टाईल लय भारी
गळतात जागोजागी, थोडी बांध त्याला दोरी
 
बारा बारा वाजेपर्यंत, चालते तुझी चॅटिंग
एवढ्या वेळात तर बाई, मी हजार पापड लाटीन 

सून म्हणाली सासूबाई, आता सोडा जुना नाद
मॉडर्न बनून तुम्हीही, जरा द्याना मला साद

फेसबुकवर तुम्हाला, देते अकाउंट काढून
मग तुम्हीही बसाल त्यात, निवांत डोळे घालून

मग काय सुरु झाला, दोघींचा मोबाईल वाला गेम
सून काय सासू काय, आता दोघी सेम सेम

 
- राणी अमोल मोरे
😅                   😆

Thursday, June 18, 2020

अंतरी


अंतरी

मानवा अंतरी शोधना 
चित्त तुझे ध्यानी लागले 

भय यातना अंत पावल्या 
करूना त्या डोळ्यात वाहिल्या 
देव जाहला मन मंदिरा 
न शोधला कुणी दुसरा 

तू रमता बाह्य स्वरात 
अंतरी नाद दाटूनी आले 
दुखः मिळाले असल्यात 
सत्याने सुख शोधुन पाहिले 

तू जसा फुलला अंतरी 
पडू दे प्रतिमा बाहेरी 
नको अडकू खोट्या रुपात 
तू शोभशी तुझ्याच स्वरुपात 

कर्माने मिळाले तुजला 
जाण त्या निष्ठेला 
नको शाश्वताच्या वाटी 
ना उरेल काही पाठी 

जाण तू ज्ञान महान 
ना कोणी मोठे लहान 
ठेविले ज्याने भान 
त्यासी मिळे निर्वाण


घामाचे मोती


घामाचे मोती

जाम घाम तुला आला 
बस थोडा विसाव्याला 
आहे काळजी देणाऱ्याला 
उगाच चिंता कशाला 

उगवेल सूर्य पहाटेला 
येईल यश तुझ्याही वाटेला 
फुलेल फूल देठाला 
मिळेल भाकर पोटाला 

शक्ती माती पोसण्याची 
गरज फक्त पाण्याची 
होईल जमवाजमव दाण्यांची 
हीच वेळ तग धरण्याची 

शिगोशिग भरतील पोती 
आनंद फुलेल तुझ्याही भोवती 
होतील तुझ्या घामाचे मोती 
मग सारे सुखाने नांदती


...कश्या फुलतील वेली ?


...कश्या फुलतील वेली ?

गर्भपात गर्भपात ठराव पास केला 
शब्द पडताच कानी श्वासाचा अंत झाला 
भंगता स्वप्न पुत्र प्राप्तीचे दिली मज शिक्षा 
न उमजले मज पुत्राचीच का मागावी भिक्षा 

नाव कळण्याआधी सरिता वनिता की माला 
भव्य स्वप्नांचा क्षणातच अंत झाला 
वेदना हळहळल्या अश्रूही तापुनी वाहले 
इवल्याश्या डोळ्यांनी आईबाबांचे स्वप्न पाहले 

उत्तरार्धात पुत्र तुमचा करेल जेव्हा बेहाल 
पश्चातापाने मग भिजतील तुमचे गाल 
बेटी बचाव बेटी पढाव अनंत गुंजली नारे 
निर्घूण कृत्याने तुम्हा जग वेडे म्हणेल सारे 

धन तुमचे हेच खरे दिव्य रत्न कन्या 
आदिशक्ती प्रतिभा अन तीच सुंदर लावण्या 
प्रश्न एकच मनी दाटला कन्या जन्माआधीच गेली 
तर सृष्टीत कश्या फुलतील वेली ? 
...कश्या फुलतील वेली ?

जलतत्त्व


जलतत्त्व

तू तत्त्व​​​​​​​ एक निसर्गाचे 
तू रूप पंच महाभूताचे 
तुझ्या विना जीव अतृप्त 
तू धरणी गाभ्यात गुप्त 

ढग फुटला वारा दाटला 
जणू महाप्रलय थाटला 
खळखळत नाथ केदार गाठला 
भूईवर तुच तू साठला 

केले क्षणात भुईसपाट 
ना सोडली कुणा वहिवाट 
विसकटता घडी निसर्गाची 
मिळे शिक्षा चिर समाधीची 

अस्तित्व जरी महान 
पिण्यायोग्य जल लहान 
कळेल मानवा महत्त्व 
लयास जाता जलतत्त्व


नावामागे तुझ्या..


नावामागे तुझ्या..

धुंदलेले माझे स्वप्न जुने 
बाळा तुझ्या कोऱ्या डोळयात पाहतो 
जगी साऱ्या गुंजेल कीर्ती 
नावामागे तुझ्या नाव माझे लावतो 

ठेच खाऊन पडलो मी जिथे 
रस्त्यावर त्या आज तुला सावरतो 
थकुन माकून हरलो मी जिथे 
तेथुन तू आज भरधाव धावतो 
नावामागे तुझ्या नाव माझे लावतो 

अशक्य जे जाहले माझ्यासाठी 
कष्टाने तुला सहज शक्य करतो 
राहुन गेली कमी जी माझ्यात 
सारी तुझ्या रुपात आज शोधतो 
नावामागे तुझ्या नाव माझे लावतो 

राहुन गेलेले जगणे माझे 
तुझ्या रुपाने पूर्ण जगतो 
साथ नव्हती गरजेला माझ्या 
तुझा हात मात्र घट्ट धरतो 
नावामागे तुझ्या नाव माझे लावतो




..आपण कसे खायायचे


एखाद्याला निसर्गाची देण असते, जळू नये त्यावर 
आपल्याकडे नाही म्हणून, उगाच फोडू नये खापर 
जीवनात निरंतर व चिरकाळ, असं काहीही नसतं 
जातांना येथेंच टाकून जायचंय, त्यालाही ठाऊक असतं 

वाहवा मिळावी म्हणून, कोकिळा कधी गात नाही 
कितीही टाळ्या वाजल्या, तरी मोर पिसारा फुलवत नाही 
हे ज्याच्या त्याच्या आवडीचे, पूर्वनियोजित काम आहे 
पाठीशी फक्त समाधानाचे, अलिखित वेतन आहे 

घेणाऱ्यावर ठरत असते, आनंदात बागडायचे 
की इतरांचे बघून, हळूच तोंड मुरडायचे 
म्हणतात ना फुकटातले चणे, नाही काहींना पचायचे 
म्हणून स्वत:चं ठरवावे, आपण कसे खायायचे 

प्रत्येकाच्या जवळ असते, काहीतरी गूढ दडलेले 
इतरांच्या नादात राहते, तसेच अंतरी झाकलेले 
रडत बसू नये, आपली वेळ गेली म्हणून
प्रयत्नाने नक्की मिळेल, स्वत:तच बघावे शोधून

- राणी अमोल मोरे

Wednesday, June 17, 2020

आज तिचा चेहरा..


आज तिचा चेहरा थोडा सुकला होता 
माझा अख्खा दिवस तिच्या हसण्यावाचून मुकला होता 

दिवस होता तसा सुट्टीचा, गप्पा अन गोष्टींचा 
नजाणे कुठला काटा तिला खुपला होता 
आज तिचा चेहरा थोडा सुकला होता..

बसली होती खाली, हसू नव्हते गाली 
डोळयात आलेला आसू पटकन तिने पूसला होता 
आज तिचा चेहरा थोडा सुकला होता.. 

वातावरण होतं थंड, कुठलच नव्हतं बंड 
ओठात आलेला शब्द माझाही आज नमला होता 
आज तिचा चेहरा थोडा सुकला होता..

दिले नव्हते पाणी, शांत होती गाणी 
नजाणे कुठला शब्द तिला आत रुतला होता 
आज तिचा चेहरा थोडा सुकला होता..

जेवण होतं अळणी, मिळत नव्हती गाळणी 
सकाळपासून मौनातच जीव तिचा गुंतला होता 
आज तिचा चेहरा थोडा सुकला होता..

सुकली होती फुले, रडत होती मुले 
सततचा नियम तिचा बराच काही चुकला होता 
आज तिचा चेहरा थोडा सुकला होता..

काहीच नव्हतं ध्यानात, विसरत होती क्षणात 
रोजचा तिचा स्वभाव आज कुठेतरी हरवला होता 
आज तिचा चेहरा थोडा सुकला होता..

सुट्टीची असते मजा, पण आज होती सजा 
माझा सारा दिवसच आनंदाविना हुकला होता 
आज तिचा चेहरा थोडा सुकला होता..

मनवायची माझी शर्थ, झाली होती व्यर्थ 
न हसण्याचा कटच जणू तिने बांधला होता 
आज तिचा चेहरा थोडा सुकला होता..

तिचं मैत्रिणीच बिनसलं होत, भांडण थोडं गाजलं होतं 
हे सारं कळताच मात्र विचार माझा थांबला होता 
आज तिचा चेहरा थोडा सुकला होता
माझा अख्खा दिवस, तिच्या हसण्यावाचून मुकला होता


..नकोस


..नकोस

सुसाट सुटलाय वारा 
म्हणून तू हेलकावू नकोस
उगाच स्वतः स्वतःला 
संपण्याची भीती दाखऊ नकोस 

पाणी जरा हेलकावले 
म्हणून नाव तुझी बुडवू नकोस 
सोन्यासारखी स्वप्ने 
उगाच धुळीगत उडवू नकोस 

कोणी आठवत नाही 
म्हणून स्वतःला विसरु नकोस 
जिव्हाळ्याचे प्रेमपुष्प 
असेच मनात दवडू नकोस 

ऋणानुबंध फुलवून मनांचे 
सुकल्यागत वागू नकोस 
द्वंद्व मनाचे छेडून 
एकट असं सोडू नकोस 

इच्छांना पंख देऊन 
उडण्यास नाही म्हणू नकोस 
स्वप्नांना वाट देऊन 
झोप अशी उडवू नकोस 

शोधत साथ कुणाची 
सैरावैरा भटकू नकोस 
गुंफुनी गीत मनाचे 
अर्धवट थांबवू नकोस 

देऊन स्पर्श फुलांचा 
काटे रुतवू नकोस 
कर तू कल्पना आनंदाची 
दुःखास विसरण्याची 

बघ त्या डोंगरापलीकडे 
लवकरच सूर्य तेवणार आहे
आजची रात्र संपुन
उदयाची पहाट उजाडणार आहे


Tuesday, June 16, 2020

..समझ रहा इंसान



राम, जीसस, अल्ला बैठे थे इंतजार में
हाँफते, काँपते खबरी को देख बोले
क्या खबर है पृथ्वी वासियों की ?
बहुत दिनोसे आवाज नहीं सुनी घंटियों की

प्रभु, पृथ्वी पर फैली है कोई महामारी
'दूतावासों' में आपके प्रतिबन्ध है जारी
आपस में दूरियों की उन्होंने है ठानी
कोई नही करता अब वहाँ मनमानी

प्रचलित हो गया 'मास्क' नाम का कपडा
और हाथ धोते रहने का बहुत बड़ा लफड़ा
'सॅनिटायझर' नामक द्रव का जोरोंसे है व्यापार
खरीददारी में उसके इंसान हो रहा है लाचार

छोटे छोटे बालक अब घर में ही रहते है
'पाठशाला' की परेशानी से बचे हुए दिखते है
सब वही खाते है जो माँ ने घर में है पकाया
समझदार है उन्होंने थोड़ा कम ही है सताया

सारे विश्व में 'आर्थिक मंदी' जोर पकड़ रही है
मानव जाती को हर तरफ से जकड रही है
किसीको भूखमारी तो किसीको मरने का डर
फिर भी इंसान लढ रहा एक साथ होकर

इंसानो को ही 'भगवान' अब समझ रहा इंसान
अस्पतालों और रास्तों में हो रही उनकी पहचान


ये सुनकर सारे भगवान एक साथ बोले
क्या मानव ने इस समस्या के राज है खोले

हाँ प्रभु, पृथ्वी पर मिले थे कुछ विद्वान्
बोले हमारा 'विज्ञान' बहुत है बलवान
उपरवालों से कहना आप ना करना एहसान
हम ही ढूंढ लेंगे हमारी समस्या का समाधान


 - राणी अमोल मोरे

बोल तो मै कुछ..



सोचती हूँ, समझती हूँ, सवारती भी हूँ
नई चीजों को अनुभवोंसे सिखती भी हूँ
हाँ मै एक छोटीसी कलम हूँ
जो बोल तो मै कुछ सकती नहीं
बस थोडा लिख देती हूँ

किसी बुद्धिमान इंसान ने कहा है
मै तलवारो से भी तेज हूँ
वो तो बस काट सकती है
मै तो काट और जोड़ भी सकती हूँ
हाँ ये एक अलिखित सच है
जो बोल तो मै कुछ सकती नहीं
बस थोडा लिख देती हूँ

कुछ लोगो को शायद मेरी जरुरत ना लगे
पर मेरे सिवा परिवर्तन नहीं हो सकता
अगर सदियों से मै न चलती
तो इतिहास की कोई कहानी नहीं होती
ये मेरे जीवन की वो दाँस्ता है
जो बोल तो मै कुछ सकती नहीं
बस थोडा लिख देती हूँ

लिखने वाले हजारो हाथ आते है
वक्त की सिमा से वो तो मिट जातें है
लेकिन मेरी लिखावट से उनके विचार
सदियों तक दुनिया में अमर हो जाते है
समय के परे मेरी हैसियत है
जो बोल तो मै कुछ सकती नहीं
बस थोडा लिख देती हूँ

अगर मै चलु तो क्रांति होती है
अगर मै चलु तो जीवन में ज्ञान है
अगर मै रुकू तो अंधकार होता है
अगर मै थम जाऊ तो जीवन थम जाता है
बस यही मेरी कीमत है
जो बोल तो मै कुछ सकती नहीं
बस थोडा लिख देती हूँ

✍ राणी अमोल मोरे 

जो बोल तो मै कुछ सकती नहीं, बस थोडा लिख देती हूँ..

Monday, June 15, 2020

बाकी है..



सूरज डूबा था लेकिन
अंधेरा होना बाकी था
कुछ था उस दिशा में
जो सुकून दे रहा था
उपर बेरंग आसमा
रंग जमा रहा था
ऊँचे ऊँचे पेडोके नए नए पत्तोने
बस खिलना शुरू किया था
पन्छियो ने थोड़ा खेलकर
रास्ता घर का पकडा था
शायद उन्हे आहट थी
कूछ प्रकृती के उपहार की
हाँ वो बात थी
बारिश के पहले मोसम की

कभी कभी जीवन जुड़ जाता है
प्रकृती के कुछ रंगो से
तब हमे अनुभूती होती है
जीवन के होने की
हमे अपने जीवन से लगाव है
और हमेशा चाहते है
जीवन अमर रहे
खुशी शांती मे है
और शांती की अनुभूती
शोर के बाद होती है
प्रकृती का गीत मधुर है
अगर सूनना है तो
उससे जुड़े रहना होता है

कुछ पाने की तलाश में
हमेशा कुछ ना कुछ
खोजा जाता है
जब पास होता है
तो उसे ही ठुकराया जाता है
ये तो बस मन की
रंगिन कहानी होती है
हर जिंदगी यादों की
अनकही फिरयादों की
बस सूनवाई होती है

अगर हमें मिटना ही है
तो गुरुर किस बात का
जाना अकेले ही है
तो किसी का साथ छुटेगा
ये डर किस बात का ?
कुछ एहसास है
तो उसे मेहसुस करो
कोई लेकर आयेगा खुशिया
ये सोचकर जीवन बरबाद ना करो
जी लो जिंदगी जब तक सांस चालू है
क्या पता अब और कितनी
हिस्से मे अपने बाकी है...​​​​​​​​​​​​​​


- राणी अमोल मोरे





कहाँ छुपाऊँ...

कहाँ छुपाऊँ मै अपनी झोपडी
इन ऊँची ऊँची मंजिलो में
कहाँ छुपाऊँ मै अपनी गरीबी
इन अमीरो की बस्ती में

ना ढंग का कपडा है
ना भूँख मिटे उतनी रोटी
किस्मत तो अमीरों की है
गरीबों की तो बस है फूटी

मैं सुकुड़ के बन गया हूँ
जैसे बापू की लाठी
तस्वीर वाली नोट तो
बस धनवानों में बाँटी

जब सड़को से लोग गुजरते है
उन्हें देखकर हम मन ही मन सोचते है
शायद हम जैसे लोग इन्हे
इस दुनियाँ के लगते नहीं है

पहले तो इंसान एकसाथ रहते थे
जानवरो से बचने के लिए
लेकिन आज जानवर पाला करते है
इंसानो से बचने के लिए

गन्दगी करने वालो ने कभी
हाथ में झाडू नहीं लिया
साफ करने वालो ने कभी
हुकुम नहीं जताया

इन इंसानो के बिच हम वो जीवन है
जो देख कर भी अनदेखा है
हमने खुदको कभी बेचा नहीं है
पर उनके कुत्तोंकी कीमत हमसे ज्यादा है

मानव सभ्यता का विकास हुआ है
निर्धन का फटा कपडा गरीबी दिखाता है
धनवानों का फटा कपडा भी
शान से चलन बन सराहा जाता है

वो इतने आगे निकल गए
की हम उन तक पहुँच नहीं सकते
और हम इतने पीछे छूट गए
की वो हमारे लिए रुक नहीं सकते

इन अमीरों की बस्ती में
मै कही दब सा जाता हूँ
कोई और क्या याद रखेगा मुझे
मै खुदही ख़ुदको भूल जाता हूँ

- रानमोती / Ranmoti

Sunday, June 14, 2020

कोविड - १९ / कोरोनाशी लढाण्यासाठी उच्च रोग प्रतिकारक लस संशोधन एक पर्याय

(दिनांक ०१-एप्रिल-२०२० रोजी IJARIIT या अंतराष्ट्रीय 
नियतकालीकेत प्रकाशित झालेल्या लेखाचा मराठी अनुवाद )

कोविड -१९ हा नव्याने सापडलेल्या कोरोना विषाणूमुळे होणारा एक संसर्गजन्य रोग आहे आणि तो वातावरणीय परिस्थितीची तमा न बाळगता सर्वत्र पसरला जात आहे. हा विषाणू लहान मुलांपासून जेष्ठांपर्यंत सर्वांना ग्रासत. खासकरून ज्यांची रोग प्रतिकार शक्ती कमी आहे अश्यांना लवकर ग्रासतो. सद्या कोविड -१९ / कोरोना प्रतिबंधित करण्यासाठी कोणतेही विशिष्ट लसीकरण उपलब्ध नसल्याने संभाव्य उपचारांचे मूल्यांकन करणारे बरेच प्रयत्न जागतिक पातळीवर सुरु आहेत. त्यापैकीच एक म्हणजे दिसून येणाऱ्या लक्षणांच्या आधारे उपचार करणे. अतिशय महत्वाचे म्हणजे सर्व संशोधकांचे एक सामान्य विधान दिसून येते की उच्च रोग प्रतिकार शक्तीचे रुग्ण त्याच्याशी लढा देऊन बरे होतात. म्हणूनच, कोविड -१९ चा उपचार करण्यासाठी उच्च रोग प्रतिकारक लस किंवा औषध विकसित करण्याची आवश्यकता आहे. उच्च रोग प्रतिकारक लस किंवा औषध तयार करण्यासाठी संशोधनास पुढे जाण्याचे काही संभाव्य मार्ग येथे प्रस्तावित आहेत.

१. कोविड -१९ / कोरोनाबद्दल सिद्ध तथ्ये
जवळपास 85% कोविड-१९ / कोरोनाचे रुग्ण त्यांच्या अंतर्गत उच्च रोग प्रतिकारक शक्तीमुळे व त्यांना दिसून येणाऱ्या लाक्षांनांच्या आधारे देण्यात येणाऱ्या पूरक औषधांमुळे बरे होतांना दिसतात तर दुसरीकडे रोग प्रतिकार शक्ती कमी असलेल्या रुग्णांना कोविड -१९ / कोरोनाच्या संसर्गापासून स्वतःला टिकवून ठेवणे कठीण होते व परिणामी त्यांचा मृत्यू होतो. यामुळे असे सिद्ध होते की केवळ उच्च रोग प्रतिकार शक्ती प्रणालीच माणवाला औषध (एंटीडोट) / लस निर्माण होईपर्यंत या धोकादायक विषाणूपासून वाचवू शकते. 

२. सध्याचे उपचार व पुढील आव्हाने 
आजघडीला कोविड – १९ च्या रुग्णांवर उपचारार्थ घसा खवखवणे, खोकला, सर्दी आणि ताप यासारख्या दिसून येणाऱ्या विविध लक्षणांवर औषधोपचार केला जातो व कोरोना विषाणूच्या सक्रिय अवस्थेत रुग्ण बरा ठेवला जातो. उच्च रोग प्रतिकारक शक्ती असलेला रुग्ण कोरोना विषाणू असक्रिय होताच पूर्णपणे बरा होतो. परंतु रोग प्रतिकारक शक्ती कमी असलेल्या रुग्णांच्या बाबतीत कोरोना विषाणू श्वसन यंत्रणेस अकार्यक्षम करून नुकसान पोहचवितो ज्यामुळे मृत्यू अधिक संभवतो. म्हणून कोरोना आजारात उपचारा दरम्यान रोग प्रतिकारक शक्ती अधिक असणे महत्वाचे. 

रोग प्रतिकारक शक्ती वाढविण्यासाठी करण्यात येणाऱ्या संशोधनात संशोधक, वैज्ञानिक आणि डॉक्टरांनी खालील बाबींचा विचार करायला हवा; 

अ. उच्च रोग प्रतिरोधक लस / औषधी
मानवी श्वसन प्रणालीवर परिणाम होण्यापासून वाचविण्याकरिता उच्च रोग प्रतिकारक शक्ती असणे इथपर्यंत ठीक आहे. परंतु आता प्रश्न आहे की रोग प्रतिकारक शक्ती कशी वाढवता येईल आणि उच्च-घनता प्रतिरोधक लस किंवा औषध तयार करणे शक्य आहे काय ? तर उत्तर आहे होय कारण रोग प्रतिकारक शक्ती हा संसर्ग (सूक्ष्मजंतू) विरूद्ध लढा देणारी अवयव, पेशी आणि रसायनांचा एकत्रित संयोजन आहे. रोग प्रतिकारक शक्तीचे मुख्य अंग पांढऱ्या रक्त पेशी, प्रतिपिंडे, पूरक प्रणाली, लिम्फॅटिक सिस्टम, प्लीहा, थायमस आणि अस्थिमज्जा आहेत. हे सर्व मानवी रोग प्रतिकारक शक्तीचे भाग आहेत जे कोणत्याही संसर्गाविरूद्ध सक्रियपणे लढा देतात. आपण या गोष्टींचा उपयोग एकमेकांशी संयोजित करून कोरोना प्रभावित आणि अप्रभावित व्यक्तीसाठी उच्च-घनतेची रोगप्रतिकारक लस किंवा औषध तयार करू शकतो. रोग प्रतिकार शक्ती वाढविणार्‍या घटकांचे भाग एकत्र करून उच्च रोग प्रतिरोधक लस / औषध तयार करणे हा संशोधनाचा एक मार्ग होऊ शकतो. 

आ. उच्च रोग प्रतिकार शक्ती दाता (डोनर)
दुसरा मार्ग म्हणजे शत्रू विरूद्ध लढाई करण्यासाठी एका देशाकडून दुसर्‍या देशाचा सैनिक घेण्यासारखे आहे. यामध्ये कोविड -१९ / कोरोना हा विषाणू मानवी जीवनाचा शत्रू आहे आणि काही सामर्थ्यवान मनुष्य ज्यांच्या रोग प्रतिकारक शक्तीने ते या कोविड -१९ / कोरोनाशी लढा देण्यास स्वयंपूर्ण व सक्षम आहेत. अश्या उच्च रोग प्रतिकारक शक्ती असलेल्या लोकांची आपण “दाता” म्हणून निवड करून कमी रोग प्रतिकार शक्ती असलेल्या दुर्बल व्यक्तीच्या शरीरात रोग प्रतिकारक शक्ती लस म्हणून टाकता येऊ शकते. रक्तदान करण्यासारखी ही संकल्पना सोपी आहे. परंतु दुर्बल व्यक्तीच्या शरीरात प्रवेश करण्यासाठी केवळ दात्याकडून उच्च रोग प्रतिकारक शक्ती कशी प्राप्त करता येईल ? त्याची लस करता येईल का ? जैविकदृष्ट्या इंजेक्शन शक्य आहे का ? इत्यादी अनेक प्रश्न संशोधकांना भेडसावतील. परंतु त्यांची उत्तरे या आधीच संशोधकांनी कर्क रोगावरील उपचार पद्धतीत दिलेली आहेत, फक्त गरज आहे अधिक प्रयत्नांची. आता वरील पैलूंचा विचार करून शास्त्रज्ञ व जीवशास्त्रज्ञ यांनी अधिक संशोधन करणे गरजेचे आहे.

३. निष्कर्ष
आता कोव्हीड -१९ / कोरोना विषाणू नष्ट करण्याकरिता वेगळ्या मार्गाने देखील संशोधनात्मक विचार करण्याची गरज आहे. कोव्हीड -१९ / कोरोना विरूद्ध लढा देण्यासाठी उच्च रोग प्रतिकारक शक्ती दात्यांकडून उच्च रोग प्रतिकारक शक्ती लस तयार करणे किंवा रोग प्रतिकारक शक्तीस कारणीभूत घटक एकत्रित करून त्याद्वारे औषध किंवा लसीचा शोध लावणे या पर्यायांचा अवलंब देखील करण्यात यावा. मानव जातीचा कर्दनकाळ ठरलेल्या कोरोना विषाणूपासून वाचवण्यासाठी वैज्ञानिक, संशोधक, जीवशास्त्रज्ञ आणि डॉक्टर यांना वरील मार्गांचा उपयोग होऊ शकतो.

- राणी अमोल मोरे 
 

To read original article visit http://www.ijariit.com

High-Density Immune Vaccine (HDIV) to be explored for fighting COVID-19

(A research article published in IJARIIT Journal dtd. 01-April-2020)

COVID-19 is an infectious disease caused by a newly discovered coronavirus and it spread across geographies, genders and occupations. It appears to plague people ubiquitously including children who, despite hopeful early reports, do not seem more immune to the virus. At present there are many ongoing clinical trials evaluating potential treatments against COVID-19 but there is no specific vaccination to restrict. However, a common statement from all researcher that high immunity patient can fight with it and get recovered. Therefore, needs to develop high-density immune vaccine or medicine to treat COVID-19. Some possible ways to move research forward to create immune vaccine or medicine are proposed herein. 


1. Proved facts about COVID-19 / Corona 

All most 85% patients recovered from COVID-19 / Corona virus because of their high level of internal immunity system with added medicinal supplements provided during the treatment on observed symptoms. On other side low immunity patients are not able to sustain the infection of COVID-19 and finally get deceased. This situation proved that only high immunity system will save the human being from this dangerous virus till the antidote comes. 

2. Treating procedure and further challenges 

At present medication on the hazardous symptoms like throat infection, cough, cold and fever are being used to treat the patient and it results positively to keep healthy during the virus active mode. Once the active mode of virus over due to antivirus immunity power then patient become recovered fully. But in case of low immunity patients it doesn’t deactivate and damaged the respiratory system which further cause for the death. 

To increase immunity following thoughts to be explored by researcher, scientist and doctors; 

a. High-density immune vaccine 

Increasing immunity is fine to fight COVID-19 / Corona before it affects to human respiratory system. But now the question is that how immunity can be increase? and is it possible to create the high-density immunity booster vaccine or medicine? The answer is YES because immunity is the combination of organs, cells and chemicals that fight infection (microbes). The main parts of the immune system are white blood cells, antibodies, the complement system, the lymphatic system, the spleen, the thymus, and the bone marrow. All these are the parts of human immune system that actively fight against any infection. We can use these parts to recombine with each other and create the high-density immune vaccine or medicine for affected and unaffected person. This is the one way to explore by recombining the parts of immunity boosting elements. 

b. High immune system donor (Immunity soldier) 

Another way is just like to take a soldier by one country from other to fight against enemy. In this case COVID-19 / Corona is the enemy of human life and some strong human being are self-sufficient by their immune system and able to fight COVID-19 / Corona which is to be further explored as DONOR to transferred their high-density immune system into the weaker one’s body. The concept is simple as to donate the blood but by taking out only high-density immune organism from the stronger one (Donor) to insert in the body of weaker one (accepter) by crating vaccine. But in this case, there are so many challenges like how to separate high-density immune organism from donor? how to take out them? Can injection possible biologically? etc. Some of the questions have already answered by researcher in other diseases. Now the more research from scientist, biologist needed by considering above aspect. 

3. Conclusion 

Now the time comes to think destroy COVID-19 / Corona by researching antidote / Vaccine / medicine. We may create the high-density immune vaccine for fighting against COVID-19 / Corona by way of recombining the high immune elements or by exploring high-density immune vaccine through donor. These are some ways may be useful to Scientist, Researcher, Biologist and Doctor for further research to save life from this human killing virus.

- Rani Amol More


To read original article click visit http://www.ijariit.com 

Saturday, June 13, 2020

...सिख़ लिया है

हमने तो बहुत सोच समझकर
बात करना सिख़ लिया है
किसीसे रिश्ता टूटेगा
किसीका मन रूठेगा
बनता काम बिगड़ेगा
कोई और क्या सोचेगा
इस डर के बोझ से
हमने सच को छोड़
झूटी बात करना सिख़ लिया है
हमने तो बहुत सोच समझकर
बात करना सिख़ लिया है

बातों बातों का ही बाज़ार है
जो बेच सके वही होशियार है
मन की बातों में उलझाएगा
उसीका जय जय कार है
हमें सब पता है
हर तरफ गरीबोंकी लूटमार है
बेवजह की बातों में
भले मनुष्य ने क्यों पड़ना
ये सोच कर हमने
चुप रहना सिख़ लिया है
हमने तो बहुत सोच समझकर
बात करना सिख़ लिया है

बहुत से लोग
खुद को होशियार
और महान बताते हैं
अंदर ही अंदर मानो
किसी शैतान को छुपाते है
ना चाहते हुए भी हम
उन्हेही अपना भगवान बनाते है
कोई बाहर से आएगा
हमें मार कर जायेगा
इस डर से हमने
खुदको ही मारना सिख़ लिया है
हमने तो बहुत सोच समझकर
बात करना सिख़ लिया है

हम सब को
बहुत बड़ा बनना है
स्टेटस के चक्कर में
रेस का कीड़ा बनना है
ज्ञान की बात तो
हर कोई करता है
असल जिंदगी में तो
उसका कबाड़ बनना है
कोई हमें पीछे छोड़ देगा,
इस चक्कर में हमने
खुदसे ही हारना सिख़ लिया है
हमने तो बहुत सोच समझकर
बात करना सिख़ लिया है

झूठी जिन्दगी मानो
लत बन जाती है
किसीकी सच्ची कड़वी बात
दवाई बन जाती है
किसीकी मीठी झूठी बात
बीमारी बन जाती है
अपनेही पतन का
कारण बन जाती है,
ये जानते हुये भी हमने
खुद को ही फ़साना सिख़ लिया है
हमने तो बहुत सोच समझकर
बात करना सिख़ लिया है

- राणी अमोल मोरे

Friday, June 12, 2020

शिक्षणाच्या बाजारातील आर्थिक व मानसिक त्रासातून मुक्ततेसाठी..

शिक्षणाच्या बाजारातील आर्थिक व मानसिक त्रासातून मुक्ततेसाठी..


शिक्षण हा आज घडीला जीवनाचा मुलभूत घटक समजला जातो. बऱ्याच पालकांना आपल्या मुलांच्या शिक्षणाची चिंता सतत भेडसावत असते. आपल्या मुलांच्या शिक्षणाच्या काळजीचा फायदा घेऊन आजपर्यंत बऱ्याच नामांकित खाजगी शिक्षण संस्थांनी आपल्याला खूप लुटले आहे आणि लुटत आहेत. खरे पाहता या खाजगी शिक्षण संस्थामधून बाहेर पडणारा विद्यार्थी शासकीय शाळेतून बाहेर पडणाऱ्या विघ्यार्थ्यापेक्षा फार काय तर थोड्या चांगल्या प्रमाणात इंग्रजी बोलू शकतो आणि थोडाबहुत नीट नेटका राहून अधिकचे इम्प्रेशन झाडू शकतो.

मला इथे असे सांगावेसे वाटते जर पालक कुठल्याही ग्वाही शिवाय या खाजगी शिक्षण संस्थांनी आकारलेली अवाढव्य फीज भरून आपल्या पाल्यांना शाळांमध्ये दाखल करण्यास तयार होत असतील तर मग त्यांनी हीच मानसिकता सरकारी शाळेबाबत दाखवायला काय गैर आहे. म्हणजे उदा. महाराष्ट्र राज्याचे शिक्षण खाते आग्रह धरत असेल की शासनाच्या शाळेत मुलांना शिकवा तर काय हरकत आहे. तुम्ही म्हणाल शासनाच्या शाळेत शिक्षण हे विनामूल्य असते इथपर्यंत ठीक आहे परंतु तेथे शिक्षणाचा आणि सुविधांचा दर्जा म्हणावा तेवढा जोपासलेला नसतो. मान्य ! परंतु यावर एक चांगला उपाय आपण पालक आणि शासन मिळून राबवू शकतो. तो म्हणजे शासनाने उच्च दर्ज्याच्या पुरेश्या प्रमाणात शासकीय शिक्षणसंस्था उभाराव्यात. तसेच शिक्षणाचा दर्जा उंचवायचा असेल तर, आर्थिक बाजू अधिक भक्कम असावी लागते हे आपण पालकांनी देखील समजून घेऊन थोड्या प्रमाणात फीज च्या स्वरुपात शासनाला मदत केली पाहिजे.

आपल्याला शिक्षणाचे खाजगीकरण फार महाग पडत आहे. आयुष्यभराची सर्वं कमाई पालक फक्त आपल्या मुलांच्या शिक्षणावर खर्च करत आहेत. त्यामुळे फक्त खाजगी शिक्षण संस्थांचे मालक अधिक धनाड्य बनत चालले आहेत. महाराष्ट्र राज्याच्या शिक्षण विभागाने परिवर्तन करण्याची नितांत गरज आहे. मोठ्या मोठ्या शहरामध्ये तर खाजगी शाळांच्या फीज भरून भरून बरेच पालक अघोषित आर्थिक आणीबाणी उपभोगत आहेत. आपल्याला राज्याचा कायापालट करायचा असेल तर शिक्षणाचे वाढते खाजगीकरण त्वरित थांबविले पाहिजे. परिस्थिती हाताबाहेर जात असतांना शासनाला फक्त मराठी शाळांचा किंवा विषयाचा आग्रह धरून चालणार नाही तर काळाबरोबर बदलावे देखील लागेल. खाजगी शिक्षण संस्थांच्या वरच्या दर्ज्याच्या मुबलक शाळा जागो जागी उभाराव्या लागतील आणि ज्या जिल्हा परिषदेच्या शाळा आहेत त्यांचा देखील कायापालट करावा लागेल.

शिक्षण क्षेत्रात अत्यंत महत्वाचा घटक शिक्षक असतो म्हणून शासनाने त्यांची निवड करतांना कडक शैक्षणिक पात्रतेसह बौद्धिक आणि मानसिक निकस लावणे देखील तितकेच गरजेचे आहे हे समजले पाहिजे. एक शिक्षक फक्त बारावी पास करून डिप्लोमा केलेला नसावा तर तो उच्च विद्याविभूषित व मुलांच्या भवितव्याचा आत्मीयतेने विचार करणारा असावा. त्याच्या मध्ये शिकविण्याची कला अत्यंत प्रभावी व प्रगत असावी आणि शासनाने वेळोवेळी त्याच्या शिकवण्याच्या पद्धतीचे अवलोकन करून आवश्यक ते बदल करून घेतले पाहिजे.

महाराष्ट्र शासनाने मनावर घेतले आणि माझ्या महाराष्ट्रातील सर्वं पालकांनी शासनाच्या पाठीशी उभे राहून आपल्या पाल्यांना शासकीय शाळेत दाखल करण्याचे धाडस दाखविले पाहिजे, जेणेकरून लुटमार करणाऱ्या धनाड्य शिक्षण संस्थांना चांगली चपराक बसेल. तसेच यातून आणखी एक महत्वाची गोष्ट देखील साध्य होईल ती म्हणजे शासनाच्या नौकरयामध्ये कमालीची वाढ.

उच्च दर्जाचे शिक्षक, सर्वं सुख सुविधांनी सज्ज शासकीय शिक्षण संस्था, अघ्यावत अभ्यासक्रम, अत्याधुनिक उपकरणे आणि अभ्यासा व्यतिरिक्त खेळ, व्यायाम व सर्वांगीण विकास यावर भर देणारी शिक्षण पद्धती ही महाराष्ट्राच्या उज्ज्वल भविष्याचे गणिक ठरू शकते. सोबतच हे सर्वं साध्य होत असतांना पालकवर्ग कुठल्याही मानसिक दडपणाखाली येणार नाही याची पुरेपूर दखल घेणारा शिक्षण विभाग व मंत्री लाभणे देखील महत्वाचे. शासन, पालक व शिक्षक यांच्या प्रयत्नातून आपण शिक्षणाचे खाजगीकरण व त्यातून निर्माण झालेले बाजारीकरण थांबवू शकतो आणि ते थांबविलेच पाहिजे जेणेकरून येणाऱ्या पिढ्या  शिक्षणाच्या बाजारातील आर्थिक व मानसिक त्रासातून मुक्तता होऊन दडपण विरहित, समानतेची शिक्षण पद्धती निर्माण होईल.

जय महाराष्ट्र..!          

-    राणी अमोल मोरे


Friday, June 5, 2020

अनुवांशिकता आणि परिवर्तन

अनुवांशिकता आणि परिवर्तन


    मनुष्यामध्ये शारिरीक आणि मानसिक गुणदोष काही प्रमाणात अनुवांशिकतेमुळे मागच्या पिढीतून पुढच्या पिढीत स्थलांतरित होत असतात. शारीरिक गुणदोषांचा विचार करता लांब केस आईकडून मुलीकडे, कानावर लांब केस वडिलांकडून मुलांमध्ये तसेच काही शारिरीक आजार जसे की मधुमेह, दमा इत्यादी. आणि मानसीक गुणदोषांमध्ये भावना, बाणेदारपणा, चटकन राग येणे, हुशारी, समजुतदारपणा, समाजाबद्दल आदर या गोष्टींचा अंतरभाव करता येईल.

एखाद्या कुटुंबातील सर्वं व्यक्तींच्या गुणदोषांचा विचार करता त्या कुटुंबाची पिढ्यानपिढ्या चालत आलेली अनुवांशिकता सहज समजता येते. परंतु, शारिरीक दृष्ट्या सोडलं तर मानसीक दृष्टया अशा प्रकारची अनुवांशिकता पिढयानपिढया स्थलांतरीत करण्याचे काम काही समाज घटक देखील करीत असतात. जसे की शाळा, महाविद्यालय, शैक्षणिक संस्था, समाजिक संस्था, प्रत्येक समाज, धर्म संप्रदाय, गावे, शहरे, तालुका, जिल्हा, राज्य विभाग¸ प्रांत देश इत्यादी. मनुष्याच्या अवती-भवती असलेल्या सर्व बाबी मानसीक अनुवांशिकतेला कारणीभूत ठरतात. कळत कळत मनुष्याच्या मनाची मानसीकता या सर्व बाबींवर अवलंबून असते. हे सर्व कशाप्रकारे प्रभाव टाकते याचा आपण अभ्यास केला तर हे लक्षात येते की, जर एखादी शिक्षण संस्था (शाळा, महाविद्यालय) वर्षानुवर्षे एकाच पध्दतीने शिक्षण पिढयांनपिढ्यांना पूरवत असेल तर त्या शिक्षण संस्थेतून बाहेर पडणा-या -याच विध्यार्थ्यांमध्ये त्या संस्थेच्या शिक्षणाच्या पध्दतीचे ठसे उमटलेले दिसतात. ते असे की ती शिक्षण संस्था विद्यार्थ्यांच्या सर्वांगिक विकासासाठी झटत असेल तर तेथील बरेच विद्यार्थी सर्वांगाने विकसीत झालेले आपल्याला पाहायला मिळतात. याउलट जर एखाद्या शिक्षण संस्थेत शिक्षणाचा अपूरेपणा असेल तर तेथील विद्यार्थी पुढे जाऊन स्वत: हे सिध्द करतात. अशा प्रकारे ह्या शिक्षण संस्था कशा आहेत याचे विश्लेषण आपण तेथील विद्यार्थ्याच्या गुणदोषावरुन करु शकतो. थोडक्यात हे जर वर्षानुवर्षे अन पिढयानपिढया असंच चालत राहिलं तर त्या संस्थेची तेथील शिक्षणाची अनुवांशिकता त्या विद्यार्थीमध्ये आलेली असते. हे झाले शिक्षणाच्या बाबतीत,

आता सामाजिक संस्था, सामाजिक संघटना, समाज त्या त्या समाजातील धर्म आणि संप्रदाय पाळण्याच्या पध्दती या सर्व गोष्टींचा विचार केला तर ह्या देखील शिक्षण संस्थे सारख्याच  जबाबदार आहेत. जर एखादा समाज पिढ्यानपिढया शिक्षणाला, स्त्री-पुरुष समानतेला, नवनवीन गोष्टींचा शोध घेण्याला मान्यता देत असेल तर हीच अनुवांशिक मानसिकता पिढयानपुढ्या त्या समाजातील लोकांमध्ये उतरत जाते कालांतराने त्या समाजाची प्रगती होत राहते. या उलट, जर एखादा समाज हा धार्मिक रूढी, परंपरा जुन्या बुरसटलेल्या गोष्टीला अंधश्रध्देला थारा देत असेल तर येणा-या पिढ्यांमध्येही तीच अनुवांशिकता दिसुन येईल त्या समाजाची अधोगती होण्यास कारणीभूत ठरेल.

    गाव, शहर, प्रांत, तालुका, जिल्हा राज्य आणि देश अशाच प्रकारची अनुवांशिकता दर्शवित असतात. जर एखादे छोटेशे गाव हे स्वच्छतेला आग्रही धरुन विकास करत असेल तर ती अनुवांशिकता तेथील लोकांमध्ये दिसुन येते. एखाद्या शहरामध्ये रहदारीचे नियम योग्य प्रकारे पाळण्याची अनुवांशिकता असेल तर त्या शहरातील नागरिक इतर शहरात गेल्यावरही आपली रहदारीची अनुवांशिकता दर्शवतात. त्याचप्रकारे एखादे राज्य, प्रांत नवनवीन तंत्र ज्ञानाला उद्योगधंद्याला पुढाकार देत असतील तर तेथील जनसंख्या आपल्या या अनुवांशिकतेने आपला वेगळा ठसा उमटवतात. संपुर्ण देशाचा विचार करता भारतीय लोक हे जर गणित या विषयामध्ये प्रावीण्य मिळविलेले किंवा संशोधनात नवनवीन गोष्टी निर्माण करण्याची क्षमता सीध्द करत असतील तर ते देखील भारत देशाची अनुवांशिकताच इतर देशात गेल्यावर प्रभावीपणे दर्शवीतात. जर भरतीय लोक विना कारण बडबड करण्यात वेळ वाया घालवत असतील, तर ती देखील देशाची अनुवांशिकताच म्हणावी लागेल.

यावरुन हे सिध्द होते की, कुठल्याही कुटुंबाची, समाजाची, शिक्षण संस्थेची, धर्म संप्रदायाची, गाव, शहर, प्रांत, राज्य आणि देशाची माहीती ही तेथील मनुष्याने पिढयानपिढया दर्शविलेल्या गुणदोषावरुन मिळविता येते. शारीरिक अनुवांशिकता वगळता मानसिक अनुवांशिकता बदलने कठीन जरी असले तरी अशक्य नाही. गरज आहे ती फक्त परीवर्तनाची, पिढयानपिढ्या चालत आलेल्या दोषांना बाजूला सारुन मानव विकासासाठी, प्रगतीसाठी आणि उज्वल भवितव्यासाठी आवश्यक असलेल्या गुणांचे अवलोकन करुन ते स्वत:मध्ये रुजवून वेळोवेळी त्यात योग्य तसा बदल घडवून आणण्याची टिकवून ठेवण्याची. सोबतच अनावश्यक -प्रगतीकारक गोष्टीला बाजूला सारून मुळासगट उच्चाटन करण्याची. म्हणजे त्या वाईट गोष्टी अनुवांशिकतेने पुढच्या पिढीत स्थलांतरीत होणार नाहीत फक्त योग्य गोष्टीच वाढत जाऊन अनुवांशिकतेणे परिवर्तन येऊन मानव जातीचा पर्यायाने समाजाचा सर्वांगीण विकास साधता येईल. परिवर्तन हा सृष्टीचा नियम जरी असला तरी अनुवांशिकतेने परिवर्तन हा देखील एक नियम होऊ शकतो.

-                         - राणी अमोल मोरे 



Recent Posts

क्या सागर, क्या किनारा।

सागर की लहरे, एक छोटे कंकड को बडी तेजी से उछल उछल कर किनारे तक ले जा रही थी। उस कंकड को बडी खुशी हुई, ये सोचकर कि मै इन लहरो के किसी काम का ...

Most Popular Posts