Search This Blog

Tuesday, December 1, 2020

बादशाह का न्यौता



वैसे तो ख़ुद कभी लड़ते नहीं थे
सहने की आदत जो पड़ी थी
दिन रात पसीना बहाकर ख़ुदका
दुसरो की इबादत नसीब से जुड़ी थी

नजाने इसबार कैसे हिम्मत जुटाई
बादशाह को घेर चारो तरफ रोक लगाई
बीके हुए तोतों ने शुरू की बात गन्दी
आवाज़ दबाने निश्चित की नाकाबंदी

उम्मीद की न कोई किरण थी
इरादो में फिरयाद फिर भी शुरू थी
खुदका वजूद ढूंढ़ने की पहल हुई थी
अपनेही हक़ के ख़ातिर जंग छेडी थी

बादशाह अमीरों का ठेकेदार था
गरीबोंकी बर्बादी का असल दावेदार था
फिर भी प्रजा के सामने शानदार था
उसका झूठा चहरा बड़ा वजनदार था

धुप में तपे चेहरों से सच बयां हो रहे थे
फिर भी तोतों के मुंह झूठ परोस रहे थे
बादशाह कैसे कामयाब है बता रहे थे
अपने बोली की कीमत चूका रहे थे

सत्य की ज्वाला भड़कने से पहले
बादशाह की खुर्सी टूटने से पहले
अपनी झूटी प्रतिमा को बचाने खातिर
बादशाह ने चर्चा का न्यौता दिया आखिर

- रानमोती / Ranmoti
(इमेज सोर्स-अमर उजाला)

Tuesday, November 24, 2020

वर्गातला बंडू


गोष्ट आहे माझ्या वर्गातल्या बंडूची 
नवीन आलेल्या बाईची 
एक दिवस शाळेत 
झाली जरा घाई 
नवीन होत्या बाई 
नाव त्यांचे बापट 
बंडूला मारली चापट 
हातात होती छडी 
बंडूला वाटली बेडी 
डोळयातुन राग गाळत 
चष्मा सांभाळत 
बाई म्हणाल्या बंडूला 
ताठ उभा रहा 
फळयाकडे पहा 
नीट कर नाडा 
बंद कर राडा 
लवकर म्हण आता 
बे चा पाढा 
बंडू थोडा कापला 
उभ्यातच वाकला 
नजर त्याची भेरकी 
घेत होती गिरकी 
वहीत लिहीलेल्या पाढ्यावर 
स्थिरावला त्याचा डोळा 
घाई घाई त्याने 
पाढा केला गोळा 
आणि सुरु झाला 
बे एके बे 
बे दुणे चार 
तिसऱ्याच अंकावर 
बंडू झाला गार 
हे बघून सारं 
बाई झाल्या सुरु 
काय रे बंडू 
आहे नुसता झेंडू 
बंडू होता धीट 
उभा राहुन नीट 
विनंती करुन म्हणाला 
चुकलं माझ जरा 
आज माफ करा 
ठेऊन सारं भान 
अभ्यास करीन छान 
तेवढ्यात वाजली घंटा 
संपला होता तंटा 
दप्तर गुंडाळत 
थोडासा रेंगाळत 
बंडू गेला पळून 
मुले मात्र त्याला 
पाहत होती वळून



Sunday, November 22, 2020

मुंगी...


आई मला आई मला एक गोष्ट सांग 
चालतांना मुंगी का गं करते रांग ? 

मुंगी बाई असते लई शिस्तप्रिय 
लहान असण्याचं तिलाच असते श्रेय 

वेळेचं तिला नेहमी असते भान 
कष्टाला तिच्या नसते कधी वाण 

मोकळं जरी असलं तिच्यासाठी रान 
शत्रूंचा नेहमी असतो टांगता बाण 

मुंगी कडुन आई मी बरंच काही शिकेन 
आळसाला आजच अंथरुणात सोडेन 

लहान जरी असेन मोठं मी बनेन 
खुप कष्ट करुन शाळा मी शिकेन



Sunday, November 15, 2020

बेवकुफी

तेरे गुस्से से परहेज नही
तेरी खामोशी मुझे सताती है
मै आदमी बेफिकर नही
बस बेवकुफी रंग दिखाती है

जानबूझकर नहीं कुछ करता
पत्थर जो ठोकर देता है
पलभर चोट ज़रूर पहुँचाता
पर खुद ही मिट्टी में घुल जाता है

तेरा चीड़ जाना लाजमी है 
मुझ से टकराना जायज है 
वफ़ा मेरी तुझ से जुडी है 
बस इतना समझना जरुरी है

- रानमोती / Ranmoti

Wednesday, October 7, 2020

हो ! मला प्रतिभा व्हायचं आहे !


हो ! मला प्रतिभा व्हायचं आहे ! 
शतकानुशतके स्त्रीने सहन केलेला अन्याय दूर करण्यासाठी 
पुरुष प्रधान संस्कृती मध्ये स्त्रीत्वाचा ठसा उमटविण्यासाठी 
यशाच्या उंच शिखरावर पोहचून देशाचा बहुमान वाढवायचा आहे 
हो ! मला प्रतिभा व्हायचं आहे ! 

प्रत्येक स्त्रीच्या मनात नवचेतना पेटविण्यासाठी 
पुरुषांपेक्षा स्त्रिया कमी नाही हे पटवून देण्यासाठी 
साऱ्या पुरुषांची मान एकदातरी आदराने झुकवायची आहे 
हो ! मला प्रतिभा व्हायचं आहे ! 

सारी गगने कर्तुत्वाच्या शक्तीने भेदून टाकण्यासाठी, 
स्त्री-शक्ती संघटीत करून देशाला सुसंस्कृत बनविण्यासाठी, 
समाजातील प्रत्येक स्त्रीला प्रेरणा देऊन तिचा आदर्श व्हायचं आहे 
हो ! मला प्रतिभा व्हायचं आहे ! 

संवैधानिक अधिकार स्त्रियांना मिळवून देण्यासाठी 
स्त्रियांचा आत्मविश्वास, अस्मिता व हक्क जपण्यासाठी 
समाजातील अतृप्त नराधमांचा समूळ नायनाट करायचा आहे 
हो ! मला प्रतिभा व्हायचं आहे ! 

स्त्रियांच्या कला, गुणांना व कौशल्याला वाव देण्यासाठी 
सशक्त व कीर्तिवंत स्त्रीत्वाचा ठसा सर्वत्र रुजविण्यासाठी 
समाजामध्ये स्त्रियांना वंदनीय स्थान प्राप्त करून द्यायचे आहे 
हो ! मला प्रतिभा व्हायचं आहे !


Sunday, September 27, 2020

सृष्टीस दान


डरकाळी तेजस्विनीची फुटताच
बरसला मेघराज
सरी ओल्या पडताच
धरणी नटली हिरवा साज

कड्या कपारीतुनी वाहताच धारा
बहरली सरीताराणी
पाहून पिसाट वारा
वृक्षवेली हसती मनी

होताच ओलीचिंब माती
सुगंध दरवळला
पाखरे किलबिल गाती
समुद्रही खवळला

निसर्गा तुझा रंगता खेळ
जणू ठरते वरदान
बसतो फुला फळांचा मेळ
करण्या सृष्टीस दान






सोनकळी


ती सुंदर सोनकळी, हसली वाऱ्यावरी 
हा वारा वेडा पिसा 
फिरे तिच्यावरी 
तिच्या अवती भवती 
पिंगा मारी 
ती सुंदर सोनकळी, हसली वाऱ्यावरी 

तिच्या सुंदर रंगाने 
तिच्या सुंदर रूपाने 
तिच्या मनमोहक सुगंधाने 
वारा गुंतला तिच्यावरी 
ती सुंदर सोनकळी, हसली वाऱ्यावरी 

पावसाच्या थेंबांनी 
ओली चिंब होऊनी 
हळुवार स्पर्शानी 
मोहित त्याला करी 
ती सुंदर सोनकळी, हसली वाऱ्यावरी 

रवी किरणात सोनकळी 
भासे चांदणी क्षितीजातली 
हसुनी मनमोकळी 
वाऱ्यासंगे डूली लागली 
ती सुंदर सोनकळी, हसली वाऱ्यावरी


Sunday, September 20, 2020

भूल करू नका..!



आहे सुकलेले पान म्हणुनी
तुडविण्याची भूल करू नका
मी तर अजूनही चिरतरुण
लढ म्हणण्याची भूल करू नका

स्वाभिमान अजूनही जागा
अपमान करण्याची भूल करू नका
अंत:करणात तेज अजूनही जागे
कमकुवत समजण्याची भूल करू नका

वेळ सुवर्ण संपली म्हणून
विसरण्याची भूल करू नका
जिंकेल तुम्हा पुन्हा हरवून
परास्त समजण्याची भूल करू नका 



वेळ


वेळ अदृश्य असूनही 
दृश्य आहे 
वेळ अज्ञानी असूनही 
ज्ञानी आहे 

वेळ अरुप असूनही 
स्वरूप आहे 
वेळ विकृती असूनही 
कृती आहे 

वेळ अपूर्ण असूनही 
परिपूर्ण आहे 
वेळ शून्यत्व असूनही 
पूर्णत्व आहे 

वेळ दुःखांत असुनही 
सुखांत आहे 
वेळ सर्वांची असूनही
कुणाची नाही



Saturday, September 19, 2020

बिडी



पारावरच्या माणसाने
पेटवली होती बिडी 
आयुष्याच्या अंताची
चढत होता शिडी

हळू हळू बिडीचा
धूर सुरु झाला
विचारांचा थवा त्याने
भुतकाळात नेला

धुराने डोळे त्याचे
होत होते लाल
बिडीचं बंडल त्याने
असंच संपवलं होतं काल

जशी जशी बिडी
जळत जात होती
त्याच्याही काळजाला
भाजत नेत होती

श्वास आत घेऊन
तो तिला चेतवत होता
कुठेतरी मनाला
आतूनच खात होता

धुरासंगे दुःखं त्याला
वाटत होती धूसर
क्षणभर का होईना

पडला त्यास विसर
पिपंळाच्या झाडाला
टेकवला त्याने कणा
उरलेल्या बिडीला 
पायाखाली चिरडून
शोधत होता मर्दानी बाणा

- रानमोती काव्यसंग्रहातून 



Thursday, September 17, 2020

लग्नाचा कोट



कवडश्यात कपाटाच्या
वस्त्र होते जुने ओत प्रोत
क्षणात स्मरिला भूतकाळ
दृष्टिस पडताच लग्नाचा कोट

चढवून जणू राजवस्त्र देहावरती
स्वार होताच अश्वावरती
वाजू लागले ढोल ताशे
आजही माझ्या काळजावरती

रुबाब त्याचा काय तो होता
सावळया वर्णावर माझ्या
सवंगडी पाहताच बोलु लागले
दिसतोस जणू बिंडा राजा

कोटावरती चमकदार साखळी
मज संगे डोलू लागली
अक्षतांचा वर्षाव होताच
कोटा संगे बोलू लागली

पडताच गऴयात वरमाला
फुलांचा सुगंध त्यास लागला
हळूच त्याने डाव साधला
उपस्थितांना मोहून गेला

हात फिरविता कोटावरती
वर भावना दाटून आली
घालताच पुन्हा घडी 
लाख आठवणी साठवून गेली

- रानमोती काव्यसंग्रहातून 


सोडताना घर



घरात माझ्या आठवणी साठल्या होत्या
सोडताना त्याला मनात दाटल्या होत्या
कितीदा भांडण येथे झाले होते
मनातले दुःखं आसू बनले होते

बसत होतो आम्ही सारे मिळून मिळून
एकमेकांच्या चुका साऱ्या गिळून गिळून
हसत होतो नेहमी सारे खळखळून
जातांना मन माझे पाहे वळून वळून

भिंतीला त्याच्या होता सुंदर रंग
येणारा जाणारा नेहमी होई दंग
बाल्कनीला एक दोरी होती तंग
पाखंराची त्यावर नेहमी चाले जंग

गूलाबाच्या कुंडीत सुंदर होतं फूल
उडणाऱ्या फुलपाखरांसगे खेळत असे मूल
दिसत होता रस्त्यावरचा उंच उंच पूल
सोडताना घर वाटलं झाली का भूल ...
वाटलं झाली का भूल



Saturday, September 12, 2020

विदर्भातील कोरडवाहू शेती आणि मानसिकता…

महाराष्ट्रातील शेती शेतकरी या दोन गोष्टींवर चर्चा झाली, की पश्चिम महाराष्ट्र नेहमीच विदर्भापेक्षा सरस ठरतो. कारण, तेथील शेती ही आपल्या शेतक-याला सधन करुन सोडते आणि शेतकरी सुध्दा आपल्या शेतीची पुरेपूर काळजी उपयोग घेऊन आपले दैनंदीन जिवनमान उंचावतो. परंतू, विदर्भात मात्र हे चित्र पहावयास मिळत नाही, याउलट येथील शेतकरी जलसिंचनाच्या अभावी शेतीकर्जाने दिवर्सेदिवस ढासळूत असून, गत काही वर्षापासून आत्महत्येच्या मार्गाने वळतो आहे. महाराष्ट्र हे एकच राज्य आणि राज्यातील वेगवेगळया प्रदेशांचा विकास आराखडा अभ्यासल्यास साम्य कोठेही आढळत नाही आणि ते लपवण्यासाठी आपण लगेच म्हणतो, भौगोलिक दृष्ट्यांचाच तो विरोधाभास, त्यात शेतकरी किवा इतर कोणी काय करणार? हे सर्व मान्य आहे, परंतु ह्या सर्व गोष्टींमुळेच का विदर्भाची अशी दयनीय अवस्था आज दिसत आहे, का त्यामागे आणखी काही कारणे आहेत जी आज आपल्याला शोधण्याची नितांत गरज आहे.

राज्यातील विविध प्रदेशांचा विचार केला असता, सर्वाधीक वेगळेपणा दिसून येतो तो येथे पडणारा पाऊस आणि शेती सिंचनाची उपलब्धता. कोकण, खानदेश, पश्चिम महाराष्ट्राच्या तुलनेत विदर्भात सरासरी पाऊस कमी पडतो आणि सिंचनाची उपलब्धता देखील कमीच आहे. पश्चिम महाराष्ट्रातील शेती ही तेथे उपलब्ध असलेल्या सिंचन व्यवस्थमुळे असल्याने परिणामी तेथील शेती मालाचे उत्पादन हे इतर प्रदेश विदर्भाच्या तुलनेत जास्त आहे. तर याउलट विदर्भाची जवळ जवळ सर्व शेती ही मुबलक सिंचना अभावी सर्वातोपरी पावसावर अवलंबून आहे, ज्यामुळे येथील उत्पादन देखील पावसासारखे भगवान भरोसेच कधी कोरडा दुष्काळ तर कधी ओला.

संशोधन आणि अभ्यास यामधून असे लक्षात आले की विदर्भामध्ये नैसगिक साधनसंपत्ती पुरेपुर असून देखील राजकीय मानसिकता, शेतक-यांची सामाजिक आणि आर्थिक विषमता, शैक्षणिक मागासलेपणा, सिंचनाच्या अपु-या सोयीसुविधा यासर्व गोष्टीमुळे शेतीच्या उत्पादनात येथील शेतक-यांच्या विकासात अनिश्चितता निर्माण झाली आहे. विदर्भातील शेतक-यांच्या विकासावर राजकीय संशोधनिक गांभीर्य वेळीच निर्माण होणे गरजेचे आहे, अन्यथा येथील शेतकरी अधिक काळोखात गुरफटत राहील परिस्थितीची फक्त चर्चा करण्याशिवाय आपल्या हाती काहीच राहणार नाही.

विदर्भामध्ये कापुस हे महत्त्वाचे नगदी पीक घेतले जाते. जवळपास आठ ते अकरा जिल्हयात कापूस माठया प्रमाणात पिकवला जातो. कापुस हा पाठीचा कणा म्हणून अकोला, अमरावती, यवतमाळ, वाशिम, वर्धा, बुलढाणा या जिल्हयात ओळखला जातो. विदर्भामध्ये १२ लाख हेक्टर जमिन ही कापूस पिकाखाली आहे परंतू ४००-६०० मीमी या प्रमाणात पडणारा कमी पाऊस, सिंचनाची कमी उपलब्धता मातीमधील अन्न-द्रव्याची कमतरता, किटकांचा प्रादुरर्भाव आणि आणखी काही भौगोलिक भौतिक कारणे यामुळे कापुस या पिकाची उत्पादन क्षमता कमी झाली आहे. विदर्भामध्ये महाराष्ट्राच्या कापुस उत्पादनाच्या १५% कमी उत्पादकता तर देशाच्या ४६% कमी उत्पादकता आज निर्माण झालेली आहे. तसेच, जास्तीत जास्त बी.टी. वाणाचा शेतक-यांकडून होणारा वापर, बी.टी. हे कमी पावसाला अती संवेदनशील असल्याने उत्पादन कमी होण्याची शक्यता आणखी वाढत आहे. 

विदर्भामध्ये फक्त ८-१० % कापुस जमीन ही चांगल्या ओलिताखाली आहे. नैसर्गिक पाण्याची साधने व पडणारा पाऊस साठवून ठेवून जवळपास सर्व कापूस जमीन ही ओलिताखाली आणणे गरजेचे आहे. संपूर्ण विदर्भामध्ये पडणा-या पावसाच्या जवळपास १५-२०% पाणी हे कापुस पिकाखाली असलेल्या जमिनीवर पडतो व वाहून जातो. त्याचबरोबर कुठल्याही मोठया-मोठया नदया विदर्भातून वाहत नाहीत म्हणून पडणा-या पावसाचे योग्य नियोजन हा एकमात्र मार्ग आहे सर्वात महत्त्वाचे म्हणजे संपुर्ण वर्षभराच्या मान्सुनचे पाणी मुरवणे व साठवून ठेवणे आवश्यक आहे. हे सर्व आपण पाणलोट क्षेत्र विकास, पाणी साठवण कार्यक्रम, कमी खर्चात धरणे, बंधारे शेतक-यांना बांधून देणे, इत्यादी कार्यक्रमांद्वारे साध्य करु शकतो. तसेच, पावसाचे पाणी वाचवण्याचा दूसरा उपाय म्हणजे पाऊसाचे पाणी वाहुन न जाऊ देता मातीत मुरवणे आणि दुसरे म्हणजे मातीत साठवून ठेवणे त्यामुळे मातीचा ओलावा टिकून राहतो, जमिनीतील पाण्याची पातळी वाढते व पाणी देण्याची गरज कमी भासते अशा प्रकारे आपण पावसाच्या पाण्याचे योग्य नियोजन करून सिंचनाची उपलब्धता निर्माण करु शकतो.

या काळोखातून वर येण्यासाठी, या सर्व बाबींवर मात करण्यासाठी सरकारी तसेच खाजगी योजना आखल्या गेल्या आहेत. उदा. (VIIDP, RKVY, MNREGS, IWMP, ISOPOM, NHM, MMA इत्यादी) VIIDP (Vidarbha Intensive Irrigation Development Program) ‍हा कार्यक्रम बुलढाणा, अकोला, वाशिम, अमरावती, यवतमाळ, वर्धा नागपूर, चंद्रपूर, गोंदीया, गडचिरोली आणि भंडारा या जिल्हयामध्ये राबवण्यात आला आहे. जवळपास १००० हेक्टर जमिनी कापूस पिकाखालील या र्काक्रमात समाविष्ट करण्यात आली आहे.

VIIDP चा महत्त्वाचा उद्देश विदर्भामध्ये पावसाचे पाणी साठवून ठेवणे त्याचबरोबर सिचणा-या सोयीसुविधा उपलब्ध करुन देणे, कापसाचे उत्पादन वाढवणे आणि वेगवेगळ्या पिकाचे नियोजन करणे, जास्तीत जास्त शेती ही कापूस पिकाखाली आणणे, त्याला पाणी पुरवठा करणे, जमिनीचा ओलावा टिकवून ठेवणे, पावसाचे पाणी साठवून त्यातून सिंचनाच्या सोयी उपलब्ध करुन देणे, तसेच तुषार आणि ठिबक सिंचनाद्वारे पाण्याची उपलब्धता वाढवणे हा आहे. त्याचबरोबर, विदर्भातील एकमेव कृषी विद्यापीठ (डॉ. पंजाबराव देशमुख कृषी विद्यापीठ) येथे सुध्दा कापूस व पावसाच्या पाण्याचे नियोजन त्यामुळे या सर्व गोष्टीवरअभ्यास व संशोधन झाले व सुरु आहे. परंतु, विदर्भातील शेतकऱ्याची परिस्थिती काही बदलत नाही कारण, या सर्व गोष्टीला विदर्भाचा शेतकरी वर्ग जागरुक नाही, कृषी विद्यापीठात झालेले संशोधन शेतक-यांपर्यंत पोहचायला पाहिजे त्या प्रमाणात पोहचू शकत नाही आणि सरकारच्या योजना कृषी खात्यातील काम करणा-या कर्मचा-यांच्या व्यतिरिक्त निवडक शेतकरी वगळता इतर शेतक-यांना माहिती सुध्दा होत नाहीत, याउलट परिस्थिती पश्चिम महाराष्ट्रामध्ये आपल्याला पहायला मिळते.

पश्चिम महाराष्ट्रातील कृषी विद्यापीठ हे आपले संशोधन शेतक-यांच्या शेतापर्यंत पोहचवत आहेत. त्याचबरोबर कृषी विभागाच्या सर्व योजना तेथे राबवल्या जातात सर्वात महत्त्वाच म्हणजे येथील शेतकरी वर्ग हा जागरुक आहे. तसेच, शेतकरी व कृषी विद्यापीठे यांचा चांगला समन्वय येथे आपल्याला पाहायला मिळतो. नवीन-नवीन योजनांचा फायदा घेऊन तसेच नवीन-नवीन तंत्रज्ञानाची माहिती मिळवून तेथील शेतकरी त्याचा प्रयोग सर्वतोपरी करतात आणि यशस्वी होतात व आपली यशोगाथा आपल्या शेतकरी मित्राला सांगुन त्याला सुध्दा आपल्याबरोबर सधन करतात. परंतु, विदर्भाचा बळीराजा मात्र या सर्व गोष्टींपासून वंचित राहतो कुठल्याही गोष्टीची नवीन कुतूहलता त्याला वाटत नाही, वाटली तरी शेतकरी एकमेकांबरोबर चर्चा करत नाहीत. तसेच, एकजूटीने नवीन योजना विदर्भात राबविण्याकरीता सरकारला आग्रही राहत नाहीत. त्यामुळे विदर्भाची परिस्थिती जशीच्या तशीच राहत आहे.

विदर्भातील शेती पावसाच्या पाण्याने कोरडी ठेवलीच आहे पण शेतकरी देखील आपल्या प्रयत्नांने ती ओलिताखाली आणू इच्छित नाहीत. कारण, विदर्भातील शेती तर कोरडवाहू आहेच सोबत येथील मानसिकता देखील कोरडवाहूच बनत चालली आहे. अशीच परिस्थिती राहिली तर शेतक-यांना आत्महत्याच करावी लागणार. काळ बदलला आहे, वेळ बदलली आहे, काळाप्रमाणे बदलतो तो टिकतो, नाहीतर मागे पडतो, म्हणून उठा माझ्या बळीराजांनो पेटून उठा. तुमच्या जवळ जी काळी कसदार जमीन आहे ती अवघ्या महाराष्ट्रात शोधून मिळणार नाही .काय झालं पाऊस कमी पडला किंवा जास्त पडला. सोनं पिकवणारी जमीन आहे तुमच्याकडे. म्हणतात प्रयत्नाने परमेश्वर मिळवता येतो आणि आपला परमेश्वर आपलं पिक आहे जे आपलं कुटुंब पोसण्याची टाकत ठेवतो. चला आता आपण सुध्दा जागे होऊ, सर्वांगाने डोळे उघडे ठेवून बघू या जगाकडै आणि बदलणा-या निसर्गाकडे, चालकासारखे सुगाव घेऊ या नवनवीन शेतीवरील संशोधनाचा, माहिती तंत्रज्ञानाचा आणि नवनविन सहकारी योजनांचा. आपणही या सर्वांचा पुरेपुर फायदा घेऊ, सोन पिकवू आणि सधन बनवूया स्वत:ला देशालाही. विसरु नका याच -हाडी मातीने भारताला पहिला कृषी मंत्री दिला, याच मातीने हरित क्रांतीचा जनक दिला आहे, त्यांच्याच स्वप्नांना साकार करु, चला संकट पछाडण्याआधी आपण संकटांना पछाडू.

-रानमोती / Ranmoti 

VIIDP  वरील शोध निबंधाच्या अनुषंगाने दिनांक २३-ऑगस्ट-२०१३ रोजी प्रकाशित झालेल्या लेखाचे पुनः प्रकाशन (http://agricoop.nic.in/sites/default/files/VIIDP.pdf) 

Recent Posts

क्या सागर, क्या किनारा।

सागर की लहरे, एक छोटे कंकड को बडी तेजी से उछल उछल कर किनारे तक ले जा रही थी। उस कंकड को बडी खुशी हुई, ये सोचकर कि मै इन लहरो के किसी काम का ...

Most Popular Posts