Search This Blog

Thursday, June 4, 2020

“विज कर्मचाऱ्यांना” अंधारात ठेऊन चालणार नाही...

विज कर्मचाऱ्यांनाअंधारात ठेऊन चालणार नाही...

  

कोरोना काळात आपण सर्वं अतिदक्षता विभागातील कर्मचाऱ्यांचे नेहमीच आभार मानत आलो आहोत आणि ते मानायलाही पाहिजेत. यामध्ये आपण खासकरून वैद्यकीय कर्मचारी, पोलीस, सफाई कामगार इत्यादींचा प्रामुख्याने समावेश केला आणि त्यांचे मनोबल उंचावण्यासाठीदिवे सुद्धा लावलेत. परंतु, हे सर्वं करीत असतांना आपण आणखी एका अत्यंत महत्वाच्या विभागाच्या कर्मचाऱ्यांचा  समावेश त्यामध्ये करणे आवश्यक होते ते म्हणजे विज कर्मचारी. ज्यांनी खऱ्या अर्थाने लॉकडाऊनच्या काळात भर उन्हा-तान्हात आपले दैनंदिन आयुष्य सुरळीत राहावे म्हणून जीवनावश्यक (दिवे, फ्रीज, पंखे) मनोरंजनाचे साधनं (मोबाईल, टीव्ही, इंटरनेट) अविरत चालावे म्हणून दिनरात कोरोनाची भीती बाळगता आपल्यालाप्रकाशदिला अश्या उर्जा विभागातील महावितरण, महापारेषण महानिर्मिती कंपनीच्या कर्मचाऱ्यांना त्यांच्या कामाला आपण अंधारात ठेवून चालणार नाही.

आता तर परिस्थिती अधिक बिकट झाली आहे.निसर्ग नावाचं भयावह चक्रीवादळ आणि पावसाळा ज्यामध्ये महावितरणचे कर्मचारी पावसा-पाण्यात, कोरोनाच्या संकटात, रात्री-बेरात्री लोकांच्या घरातील अंधकार दूर करण्यासाठी सतत प्रयत्नरत आहेत. अश्या सर्वं कर्मचाऱ्यांना त्यांना तितक्याच जोमाने मार्गदर्शन करणाऱ्या सर्वं कार्यतत्पर अधिकाऱ्यांना एक दक्ष नागरिक म्हणून आपण मानाचा मुजरा केलाच पाहिजे. महावितरणने देखील अश्या धाडसी कर्मचार्यांना अधिकाऱ्यांना प्रकाशझोतात आणले पाहिजे. त्यांचे फोटो, व्हिडीओ बिकट परिस्थितीत केलेली कामे यांना सोशल मिडियावर प्रसार माध्यमांसमोर आणले पाहिजे.जेणेकरून, सामान्य नागरिकांचा महावितरण विज कर्मचाऱ्यांच्या प्रती विश्वास वाढेल त्यांचे मनोबल उंचावून ते आणखी जोमाने कर्तव्यदक्ष होतील.

सोबतच अत्यंत महत्वाची बाब म्हणजे ज्याप्रमाणे लॉकडाऊनच्या काळात आपण चुकता मोबाईल, टीव्ही केबल चे बिल वेळेत भरून आपल्या सुखसोयींना जोपासत आहोत, तसेच आपण ही सर्वं साधनं ज्या विजेवर अवलंबून आहेत त्या विजेचे बिल भरणे देखील तितकेच अगत्याचे आहे. कारण आज कोरोना सोबतच आपल्यावर जे आर्थिक संकट आले आहे ते विज कंपन्यांवर देखील तितकेच मोठ्या प्रमाणात आलेले असणार. त्यांना देखील विज विकत घेऊन आपल्या दारापर्यंत पोहचवावी लागते. अश्या परिस्थितीत आपण अनाठाई खर्च टाळून आपल्या जीवनावश्यक वस्तूंच्या खर्चावर अधिक भर देणे गरजेचे आहे ज्यामध्ये अन्न, वस्त्र निवारा या सोबतच विज देखील सामील आहे हे विसरू नये.  

Monday, June 1, 2020

सख्या, सोबती निसर्गा..


सख्या, सोबती निसर्गा


हे काळजी वाहू निसर्गा ! तुझ्या धरतीच्या गर्भात जो तप्त ज्वाला उचंबून बाहेर येऊ पाहतो, त्याही पेक्षा अनंत वेदना आणि माझे दु: माझ्या अंतरमनातुन बाहेर येऊ पाहतायेत. हे सख्या निसर्गा, कोणी नाही ज्याकडे वेदना व्यक्त कराव्यात. अनंत जीव तुझ्या या धरतीवरचे विनाकामाचे माझ्या. हे सवंगडया निसर्गा, लाव्याने जमीनीला जोराने धक्का मारावा तशा वेदना मनातुन शरीराला धडकत आहेत. मनाचे पाणी तर त्यांनी केव्हाच केले, शरीरही दुभंगण्याच्या परीस्थीतीत आहे. या शरीराचा भुकंप कधी होईल सांगता येत नाही. फक्त दु:ख यागोष्टीचे आहे, तु जी मेहनत घेतली मला घडवायला, माझी कलाकृती साकारायला, त्याचं मात्र माती मोल होणार. काय विचार केला असेल ना तु मला घडवताना, की तुझ्या या सुंदर सृष्टीमध्ये मी एक फुलपाखरासारखे आयुष्य व्यतीत करावे. मला माहीत आहे तुलाही वेदना होत असतील माझी परिस्थिती पाहुन. शेवटी तुच खरा मित्र नाहीतर आयुष्यात काही लोक येतात अन मित्र, सखा, सोबती मी तुझा बनेल म्हणून बसतात, अन प्रत्येक्षात मात्र शत्रुपेक्षाही अस‍हय्य दु:खं देऊन जातात. अशा लोकांना तु बनवलेच कशाला ? ज्यांनी दुसऱ्यांच्या आनंदाचा जणू बाजार मांडला. माझ्या आयुष्यात अश्याच व्यक्ती आल्यात, आज ज्या मला शनीच्या साडेसाती सारख्या छळत आहे. येवढेच नाही निसर्गा तर त्यांचे रक्तबंध माझ्या राशीमध्ये राहु केतु सारखे फीरत आहेत.
हे वनराईच्या स्वामी, मला तुझी अगाद शक्ती देऊन जा. मला नको आहे असले जगणे. ज्यात श्वास घेतांनाही वेदणांचा पूर वाहतो. तु तुझ्या त्या सुदंर आनंदात मला विलीन करुन पुसुन टाक सर्व दु:खं, सर्व वेदना आणि पळवून लाव हे राहु-केतू. नष्ट कर तु त्यांना तुझ्या अगाध शक्तींनी. हे निसर्गा, बन माझा खरा सांगती माझे सारे दु:ख पीऊन टाक. येऊ दे सु:खाचे वारे, येऊ दे आनंद, ओसंडुन वाहु दे समाधानाचे झरे, मन भरुन टाक प्रीतीने तुझ्या. होशील का तु माझ्या आठवणीतला प्रेम जीव्हाळा, प्रीतीच्या भक्तीने तुझ्या विसरु दे माझे जगने. जे जगले आजवर मी त्यास नवी दिशा दे, नवी उमेद दे, दे पंख नवे उडण्या मनसोक्त विहारी. हे निसर्गा बुद्धा पीऊन टाक ‍चिंता माझी, पुर्ण कअर्जी माझी, हीच असे विनवनी तुला. मला ना कळे किती आयुष्य माझे. जे होते ते फार रे वाईट गेले, उरले किती कल्पना नाही. पण इच्छा असे आनंदाने क्षण-क्षण भरुन जावा, वेदनांचा साऱ्या चुरा व्हावा, शांतीचे फुले फुलावी. मनाच्या धरती-वरती होऊदे कृपा तुझी. मीळु दे सर्व मला जे उत्तम येऊन परत गेले. मीळु दे साथ खऱ्यांची, मीळु दे साथ जीव्हाळयाची तुझी, हे निसर्गा सवंगडया वेदना माझ्या जानुन, धावून ये वाचवाया. कळू दे माया तुझी मजवरती, जळु दे चिंता साऱ्या, विसरु दे जे अनआवडीचे, नष्ट होऊ दे जे नकोशे मला, अतं होऊ दे त्रासांचा, जळू दे मनुष्य सारे राहु केतु गत लाभलेले. हे परममित्रा ऐक माझी हाक जरा, नको असा नष्क्रिय होऊ. हवा आहे हात मला तुझ्या सहाऱ्याचा, गरज मला तुझी सख्या श्वासापरी. नको करु उशीर, प्राण कंठाशी दाटून आला. ये धावूनी पावसाच्या गत, प्रकाशाच्या कीरणागत, वाऱ्याच्या वेगागत. तु भेटता मन माझे त्रुप्त होईल. दुबळेपणा गळुन जाईल, आनंदाचा वर्षाव होईल, हे निसर्गा जगण्याला नवी दिशा मिळेल. स्वप्न माझे पुर्ण होईल, जीवणाचे नाही माती-मोल होणार. घडवण्या मला ज्या भोळया-भाबडया हाताने कष्ट उपसले, नाही जाणार वाया श्रम त्यांचे. दे मला शक्ती, दे मला युक्ती, या व्हयु चक्रातुन बाहेर पडण्या, ज्याने घातल्या बेडया पायात माझ्या, कर मुक्त मला, नको करु स्वामी कोणी माझा, नको बनवू गुलाम मला कुणाचे. जे आयुष्य तु मला बहाल केले, जगुदे स्वतंत्र मला माझे. नष्ट कर या परंपरा की कुणी कुणाचे काम करावे, की कुणी कोणासाठी इच्छा मारुन टाकावे. नष्ट कर हे असले रीती रीवाज, नको मला बेडयात बांधू, जी भासे जनु आहे काळया पाण्याची शिक्षा. नको ईवल्याशा जीवला छळू. गोंजारावे तु मायेने तुझ्या, बनव माझे विश्व पुन्हा नवे सर्व, नवे मनासारखे, हास्य अखंड असावे, प्रीतीचा, वारा अनंत वाहावा कणाकणातुनी, नष्ट कर आठवणी ज्या नकोशा झाल्या, तृप्त कर आत्मा नवचेतनेने, नवप्रकाशाने. कृपा तुझी झाली जर, अनंत उपकार विसरणार नही जन्मभर.

- राणी अमोल मोरे



Recent Posts

Mumbai’s teen innovator and author Arjit More wins International Excellence Award 2026

Teen author and innovator Arjit More from Washim has been honoured with the International Excellence Award 2026 for his research-driven writ...

Most Popular Posts